
एटापल्ली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) ने कॉर्पोरेट क्षेत्रात नवा आदर्श प्रस्थापित करत गडचिरोली जिल्ह्यातील आपल्या १,६९२ कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOP) शेअर्सचे वाटप केले. सोमवारी हेडरी झोन येथे आयोजित ESOP वितरण समारंभात हा महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. या वाटपामुळे आतापर्यंत एकूण १०,६३१ कर्मचाऱ्यांपर्यंत स्टॉक ओनरशिपचे लाभ पोहोचले आहेत.
व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली, लॉयड्स मेटल्सने एकेकाळी नक्षलवादासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला एका विकसित औद्योगिक केंद्रात रूपांतरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ESOPs मुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसोबतच, कंपनीच्या प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज व भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहून झाली. उपस्थितांना संबोधित करताना प्रभाकरन यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि जोर देऊन सांगितले की, ते आता केवळ कामगार नसून, ESOPs च्या माध्यमातून कंपनीचे भागीदार झाले आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि मेहनत करणाऱ्या व उत्साही तरुणांना जागतिक स्तरावर सर्वात कुशल व्यावसायिक म्हणून उदयास पाहण्याची आपली दृष्टी मांडली. त्यांनी आठवण करून दिली की, या भागाला मुख्य प्रवाहात आणण्याची दूरदृष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती आणि लॉयड्स मेटल्स ते स्वप्न सक्रियपणे साकार करत आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रदेशाच्या विकासासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे आवाहन करत याला राष्ट्रसेवा असे संबोधले.
प्रभाकरन यांनी लॉयड्सची दीर्घकालीन बांधिलकी अधोरेखित करताना गडचिरोलीला “नवीन जमशेदपूर” मध्ये रूपांतरित करण्याची आपली महत्त्वाकांक्षा पुन्हा व्यक्त केली. त्यांनी यावेळी जमशेट टाटांनी पोलाद उद्योगाची पायाभरणी करून टाटा समूहाला जागतिक स्तरावर कसे नेले, याचा संदर्भ दिला.
त्यांनी विश्वास व्यक्त केला की, कंपनी आणि हा प्रदेश दोन्ही एकत्र वाढतील आणि एक दिवस LMEL चा एक कर्मचारी कंपनीचा संचालक म्हणून निश्चितपणे पुढे येईल. त्यांनी यशस्वी कार्यासाठी दूरस्थ भागात काम करण्याचा निर्णय घेणाऱ्या डॉक्टर, अभियंते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. ज्यामुळे कंपनीचे यशस्वी कार्य सुरू राहिले. तसेच, सुरक्षित आणि समावेशक कार्य वातावरण तयार करण्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला, जिथे पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान समर्पणाने योगदान देत आहेत.