Home Breaking News १ मेचा त्रिवेणी उत्सव: महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा —...

१ मेचा त्रिवेणी उत्सव: महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा — गडचिरोलीत उत्साहात साजरा

0
33

 

१ मेचा त्रिवेणी उत्सव: महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा — गडचिरोलीत उत्साहात साजरा

गडचिरोली/ आज दिनांक १ मे २०२६ रोजी संपूर्ण देशासह महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या त्रिवेणी उत्सवाचे औचित्य साधत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या स्थापनेला अभिवादन करत “सह्याद्रीची शान, शिवरायांचा अभिमान” या घोषवाक्यासह मराठी अस्मिता, संस्कृती आणि पराक्रमाची आठवण नागरिकांनी जागवली. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कामगार दिनानिमित्त विविध कामगार संघटनांकडून सभांचे आयोजन करून कामगारांच्या कष्टाचे आणि योगदानाचे स्मरण करण्यात आले. कामगार हक्क, सुरक्षितता आणि कल्याण यावर विशेष भर देण्यात आला.

दरम्यान, बुद्ध पौर्णिमेनिमित्त शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांना उजाळा देत बौद्ध बांधवांनी प्रार्थना, ध्यान व प्रवचनांद्वारे “शांतता, करुणा आणि समता” या संदेशाचा प्रसार केला.

अहेरी उपविभागात उत्साहपूर्ण साजरा

गडचिरोली जिल्ह्यातही हा त्रिवेणी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अहेरी उपविभागातील तहसील कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला वंदन करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण केले.

तसेच प्राणहिता पोलीस कॅम्प, अहेरी पोलीस स्टेशन आणि

आलापल्ली पोलीस चौकी येथेही ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

नागेपल्ली येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात

नागेपल्ली येथील बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रार्थना, ध्यान व प्रवचनांसोबतच

नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बुद्धांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

वनविभाग व पतसंस्थांचा सहभाग

आलापल्ली वनविभागांतर्गत अहेरी, आलापल्ली, पेरमिली, चामोर्शी, पेडीगुडम, घोट, मार्कंडा या ठिकाणी ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

शासकीय वन कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या आलापल्ली येथे सकाळी ८:३० वाजता संचालक श्री. गणेश पसपुनुरवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी पतसंस्थेचे सचिव, कर्मचारी, वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आलापल्ली व पेरमिली वनपरिक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौखे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक व वनरक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.

एकजुटीचा संदेश

या त्रिवेणी संगमामुळे जिल्ह्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी एकजुटीने, पराक्रमाने आणि संस्कृतीने महाराष्ट्र अधिक उज्ज्वल करण्याचा संकल्प व्यक्त केला.

“मराठी मातीचा दरवळ कायम राहो महान, एकजुटीने उजळू दे आपला महाराष्ट्र!” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here